Saturday, January 26, 2013

एक दोरी असावी आपुल्या हाती
जी धरुन ठेवेल काळाची गती

मग होईल मनासारखं सारं
उघडतील सारी भाग्याची दारं

मनासारखं  मग जगता येईल
मनमुराद मग हसता येईल

कधी धावता, कधी अडखळता येईल
कधी मनमोकळे रडता येईल

कधी सुखांसाठी मन धावेल
कधी नवसावाचुन देव पावेल

सारे काही हाती असेल
मग उगाच कशाला भिती असेल

बालपणीचे खेळ ना संपतील
जवानीच्या रंगातही रंगतील

इंद्रधनु जे रंग बरसतील
आकाशातुन मनी उतरतील

आयुष्याची सांज जेव्हा सरेल
मस्त आठवणींच्या धुंदित झुरेल

सारेच फासे आपले पडतील
मरणाचेही सोहळॆ घडतील
ते आज अचानक रस्त्याने जातांना दिसले
वयापेक्षा थोडे जास्त थकलेले भासले

मी धावत जाऊन त्यांना तेथेच थांबवले
त्यांच्या उपकाराने मला पाठीत वाकवले

नमस्कारासाठीचे हात त्यांनी मध्येच थांबवले
मला उभे करुन आपल्या गळ्याशी लावले

"किती मोठा झालास तु?" त्यांचे डोळे पाणावले
तो प्रेमळ स्वर ऎकुन माझॆही  बांध सारे फुटले

गर्वाने रुंद त्यांच्या छातीत मी स्वताला सोपवले
"काय करतोस आता "गुरुजींनी मला विचारले

माझी प्रगती ऎकुन ते खुपच सुखावले
"शाळेत किती रे मार खायचास?"ते गमतीने म्हणाले

मला पुढे शिकवण्या सर्वांशी ते किती होते भांड्ले
त्यांनी दिलेली पुस्तकं मी आजही आहेत साठवले

"घरी चला "म्हणताच ऎकदम गोड हसले
डोक्यावर हात ठेवुन,पुन्हा येईन म्हणाले

माझ्या सारख्याच कुणासाठी तरी ते लगबग निघाले
जातांना त्यांचा फाट्का शर्ट आणी झिजलेल्या चपला एवढेच मला दिसले.............
आली होती स्वप्नात एक परी...
एक नवीन जग दाखऊन गेली ...
लावुनी आस भेटण्याची मनाला,
स्वप्न नुसताच दाखवून गेली ...

आसक्तिपरी मन मझ,
गुन्तल तिच्या प्रेमात,
न रहवुनी विचारले असता,
नकार मात्र कळवून गेली ....

तुटला सगळ मन,
राहिले फ़क्त शब्द,
सुंदरशी छाप मात्र,
मनावर माझ्या उमटवून गेली ...

दिसणे सुन्दर, लाजने हळूच,
होकर द्यावा तिच्याही मनात आहे,
नकळत का होइना,
मनाला मन मात्र जोडून गेली ....

खुप वेळ वाट पहिली,
चेहरा तिचा उतरला,
हळूच हसून होकार तिने कळवला,
सूर्य किरण डोळ्यावर येता,
झोप सगळी निघून गेली,
स्वप्नात होकार देऊन मात्र,
प्रेमाच स्वप्न अधुरच सोडून गेली ....
जर सुखातच  नांदत गेलो ,तर दु:ख  काय ते काळले  नसते .
             जर दु:खाचा डोंगर कोसळला नसता ,
             तर सुखाची किंमत नसती .
 दु:खाच्या मागे सुख दाडलेले  आहे ते विसरायचे नसते ,
    सुख-दु:खाची सावली जीवनात येत जात असते
       सुखाचे दिवस आले की ,हवेत उडायचे नसते .
    दु:खाने पाठलाग केला की ,हिंमत हरायची नसते .
                सुखात जसे आनंदाने जगतो ,
तसे दु:खाच्या प्रसंगात पण हिंमातीने जगायचे असते .
          या जगात खूपच माणसे दु:खी आहेत .
            त्यांचा पण विचार करायाचा असतो
         दु:ख कुणाच्या कायमस्वरूपी राहत नाही ,
              हे मनात समजून घायचे असते .
सुखाचा  दिवस आला की दु:खी माणसांना विसरायचे नसते ,
चला जगू या आनंदाने परमेश्वराची आपल्यावर कृपा वाहतच असते .
               ज्यांनी आपल्याला हे जग दाखविले ,
               त्यांचे उपकार विसरायचे नसतात .
         दु:ख देणारा आणि सुख देणारा पण तोच असतो
                  दु:ख त्यांनी दिले नसते  ,
     तर त्यांनाच आपण हमखास विसरलो आसतो.
आभाळ जरी कोसळले तरी ,कोणाला न सांगावे !
घरातील कटकटी घरातच निपटावे !
आपले गुपित , दुसऱ्यांना  का सांगावे ?
आपसातील प्रश्न आपसातच सोडवावे !
रक्ताचे नाते हे रक्ताचेच आसवे!
रक्ताच्या नात्याला आपणच का तोडावे ?

ते सत्य कायमस्वरूपी मनात ठेवो !
सर्व कुटुंबाने खाऊन -पिउन गोडी -गुलाबीने राहावे !
जिव्हाळ्याचे गोड शब्द बरोबर ठेवावे !
विनाकारण कटकटी'ने डोके का फिरवावे ?                                         
एपतिप्रमाने खर्च करून गोड स्वप्नात झोपावे !
आपले पाय जेवढे  लांब आहेत तेवढेच अंथरू पसरावे !
दुसऱ्याच्या सुख सुविधा पाहून आपण ईर्षेने का जगावे ?
आपल्या कडे जे काही आहे त्याचातच समाधान मानावे !
समाधान हीच सुखी जीवनाचे किल्ली  आहे हे सत्य कधिच न विसरावे !
स्वत: सुखी राहून इतरांची झोप का उडवावी ?

हे जीवन जगण्यासारखेच आहे !
आनंदाने जगुन  दाखवावे !
नैराश्यला खोल खड्डयात पुरून हसत खेळत जगावे !
डोळे मिटले कि एकटेच जाणार आहेत ,हे सत्य कधी  न  विसरावे !
कोणीही बरोबर येणार नाही हे मनातल्या  मनात समजून घ्यावे !
जिवंत आहेत तो पर्यंत अगदी  नीट प्रेमाने वागावे !
झाले गेले सर्व काही मनापासून विसरावे